क्रांती नगर रिक्षा स्टॅन्ड ते दुर्गा नगर पर्यंतच्या अनाधिकृत पार्किंगमुळे नागरिकांचे हाल..!!


मुंबई : क्रांती नगर रिक्षा स्टॅन्ड, (कांदिवली पूर्व)  पासून ते दुर्गा नगरला जाणाऱ्या रस्त्यावर रिक्षावाल्यांच्या अनाधिकृत पार्किंग मुळे नागरिकांना आणि इतर वाहनांना देखील मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. ही पार्किंग सायंकाळी सात पासून ते सकाळी अकरा वाजेपर्यंत असतेच. यामध्ये काही रिक्षावाले सकाळी लवकर पार्किंग मधून रिक्षा काढतात तर काही उशिरा. सकाळी सर्वांनाच कुठे ना कुठे जायची घाई असते. अशामध्ये शाळेची बस, बाईक तसेच बेस्ट बसेस यांची रेलचेल चालूच असते. अशामधे मुजोर रिक्षावाले बस टर्न घेते त्या ठिकाणी रिक्षा उभे करून पॅसेंजर भरत असतात. त्यांना कोणी काही बोलले तर भांडण आणि मारामारी करण्यास लगेच तयार होतात.

लहान मुले, वृद्ध माणसे आणि महिला देखील ये जा करत असतात. मागे पुढे न बघता हे लोक कसेही रिक्षा टर्न करतात. पूर्वी या रोडवरून बेस्ट ची २८८ नंबरची बस पण जायची, पण या अनाधिकृत पार्किंग मुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक ची समस्या निर्माण होत असल्यामुळे त्यांनी या मार्गावरील बस वाहतूक बंद केली. याचा मोठा फटका येथील नागरिकांना बसला. तसेच क्रांती नगर रिक्षा स्टॅन्ड पासून ते मालाड पूर्व याठिकाणी देखील याच रस्त्यावरून बेस्ट ची बस जात होती. त्यामुळे रहिवाशांचा प्रवास करणे देखील सोयीस्कर व्हायचे. ती बस देखील बंद करण्यात आली. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.

Advertisement

दुर्गा नगर येथे राहणाऱ्या लोकांना खासगी किंवा शेअर रिक्षा शिवाय पर्याय नाही आणि त्यामधे पण रिक्षावाल्यांच्या अटी असतात. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. महानगर पालिकेने कोणतीही जागा वैध स्वरूपात पार्किंग साठी दिलेली नाही. जर जागा दिली असेल तर त्यासंबंधीचे बोर्ड वगैरे लावायला हवेत. जसे की (BMC PAY & PARK). वाहतूक विभागाकडे देखील यासंबंधीची माहिती असेलच की ही जागा खरोखर महानगर पालिकेने रिक्षावाल्यांना पार्किंग साठी दिली आहे की नाही. सायंकाळ पासून ते सकाळ पर्यंत तीन तीन लाईन लावून ऑटोरिक्षा पार्किंग केली जाते.

रात्रीच्या वेळेस एमर्जन्सी मधे जर एखादी मोठी गाडी आली किंवा अग्निशमन दलाची गाडी आली तसेच ऍम्ब्युलन्स ला जायचे असेल तर त्यांना जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे क्रांती नगर रिक्षा स्टॅन्ड पासून खाली गोकुळ नगर आणि दुर्गा नगरला जाणाऱ्या रस्त्यावरील अनाधिकृत पार्किंग कायम स्वरूपी हटवून हा रस्ता नागरिक आणि बेस्ट बसेस साठी खुला करण्यात यावा अशी मागणी येथील स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.


0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
अभिजीत अशोक पाळेकर
अभिजीत अशोक पाळेकर
1 year ago

*”अनधिकृत पार्किंगचा विळखा – एक गंभीर प्रश्न, केवळ वाहतुकीचा नाही तर नागरी अस्तित्वाचाही!”*

लेखक: नागरिकांच्या वतीने एक जागरूक आवाज

प्रामाणिक, निर्भीड पत्रकारितेची खरी ताकद म्हणजे सामान्य माणसाच्या प्रश्नांना आवाज देणं – आणि ही ताकद किसन राम गायकवाड यांनी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
क्रांती नगर रिक्षा स्टॅन्ड ते दुर्गा नगर या परिसरातील अनधिकृत रिक्षा पार्किंगच्या समस्येवर त्यांनी निर्भीडपणे मांडलेला मुद्दा अत्यंत विधायक आणि काळानुरूप आहे.

किसनजी, आपल्याला या समस्येला वाचा फोडल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
आपल्या अशा पत्रकारितेमुळेच समाजात जिवंतपणा टिकून आहे आणि प्रशासनालाही उत्तरदायी बनण्याची आठवण होते.

मात्र, या मुद्द्याची मुळे अधिक खोलवर आहेत – आणि म्हणूनच आपण याही पुढे विचार केला पाहिजे.

या समस्येची मुळे आणि परिणाम – फक्त वाहतुकीपुरती नाहीत:

1. शिस्तभंग आणि नियोजनाचा अभाव: शहराचा विस्तार वेगाने होत असताना वाहतूक व्यवस्थेची पुनर्रचना मात्र होत नाही. रिक्षा स्टॅन्ड, ऑटोझोन, पार्किंग स्पॉट्स यांचे नियोजन कोण करतं?

2. स्थानिक प्रशासनाची भूमिका: नियमित गस्त, सीसीटीव्ही, वाहतूक नियंत्रण पथके यांची अनुपस्थिती म्हणजे अनधिकृतता वाढण्याचे खुले निमंत्रण.

3. स्थानिक राजकारण व निष्क्रियता: अनेकदा राजकीय दबावाखाली अतिक्रमणाबाबत प्रशासन गप्प बसते – आणि त्रास मात्र सामान्य जनतेला.

4. अशा पार्किंगमधून फोफावणारे इतर प्रश्न: नशा, हुज्जती, धक्काबुक्की, महिलांचा असुरक्षिततेचा अनुभव – हे केवळ रिक्षांचे नव्हे तर सामाजिक आरोग्याचेही लक्षण आहे.

यावर उपाय काय?

वाहतूक पोलिस व स्थानिक प्रशासनाने संयुक्त कृती आराखडा तयार करावा.

रिक्षा चालकांसाठी निश्चित पार्किंग झोन ठरवून त्यांच्यावर कठोर नियंत्रण ठेवावे.

नियमित जनसंवाद परिषद घेऊन नागरिकांचे अनुभव थेट प्रशासनापर्यंत पोहोचावेत.

‘स्मार्ट सिटी’ तत्वावर आधारीत वाहतूक नियंत्रण तंत्रज्ञान राबवावे.

एक व्यापक सामाजिक चळवळीची गरज:

किसनजींसारखी पत्रकारिता ही सुरूवात आहे. आता गरज आहे ती संपूर्ण समाजाने एकजुट होऊन या प्रश्नांवर सांघिक पातळीवर आवाज उठवण्याची – आणि त्यासाठीच आपण सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून, विविध विभागांमध्ये निवेदन देऊन आणि लोकप्रतिनिधींना जाब विचारून ही समस्या मुळासकट सोडवू शकतो.

शेवटी एकच मागणी: प्रशासनाने कृती केली नाही, तर नागरी लोकशक्ती मैदानात उतरेल… आणि यावेळी रस्त्यावर उतरलेली जनता ही फक्त मोर्चा नाही, तर परिवर्तनाची सुरुवात असेल!

किसनजी, तुमच्या ज्वलंत आवाजामुळे ही ठिणगी पेटली आहे – ती आता विस्तृत आगीचे रूप घेईल आणि बदल घडवून आणेल, याची खात्री आहे.

Translate »
error: Content is protected !!
1
0
Would love your thoughts, please comment.x
()
x